भोपाळ – मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त कारवायाचा मोठा फटका बसणाऱ्या तीन जिल्ह्यांच्या प्रशासनात त्या राज्याच्या सरकारने बदल केला असून त्यांनी हे तिन्ही जिल्हे एकाच प्रशासकीय विभागात आणले आहेत.
तेथे नक्षली कारवायांचे प्रभावीपणे नियंत्रण व्हावे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. दिंडोरी, बालाघाट आणि मांडला अशी या तीन जिल्ह्यांची नावे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांची पोलीस व्यवस्थाही आता एकत्र करण्यात आली आहे.
या तिन्ही जिल्ह्यांचे प्रशासन आता बालाघाट प्रशासकीय विभाग असे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली 29 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता व त्याची अधिसूचना 1 डिसेंबर रोजी जारी करण्यात आली आहे.