नवी दिल्ली – दिल्लीत दुचाकी वाहन चोरी करून त्याद्वारे जबरी चोरी, व साखळ्या हिसकावण्यासारखे प्रकार करणारी एक टोळी दिल्ली पोलिसांनी आज जेरबंद केली.
आऊटर दिल्लीच्या भागात सोन साखळ्या किंवा मंगळसुत्रे हिसकावण्याचे अनेक प्रकार सतत घडत होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी पाळत ठेऊन येतील काही जणांना ताब्यात घेतले त्यावेळी या टोळीचा पर्दाफाश झाला.
या टोळीने सुमारो 125 दुचाकी वाहने चोरली असल्याचे तपासात उघड झाले आहे. याच चोरलेल्या गाड्यांचा वापर करून हे लोक चोऱ्यांचे प्रकार करीत असत. सोन साखळ्या हिसकावणाऱ्या अन्य गुन्हेगारांनाही या गाड्या भाड्याने किंवा कमिशन बेसिसवर दिल्या जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी एक पथक स्थापन केले होते.
त्यांनी एकूण पंधरा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींनी सुलतानपुरी व आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरल्या आहेत. सागर नावाचा एक इसम या टोळीचा म्होरक्या आहे.
त्याच्यावर चोऱ्या व मंगळसुत्रे हिसकावण्याचे एकूण 33 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या टोळीच्या ताब्यातून चोरीचे सहा फोनही जप्त करण्यात आले आहेत.