नवी दिल्ली, दि.27 -फेरीवाले-पथारीवाले आणि छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज नव्हे; तर मदतीच्या विशेष पॅकेजची गरज आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारला लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातील फेरीवाल्यांशी व्हर्च्युअल संवाद साधला. त्याआधी ट्विट करून प्रियांका यांनी भूमिका मांडली.
लॉकडाऊनच्या काळात फेरीवाले-पथारीवाले आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. उपजीविकेचे साधन हिरावले गेल्याने त्यांच्यासाठी घर चालवणे अवघड बनले, असे प्रियांका यांनी म्हटले.