नवी दिल्ली – त्रिपुरा येथे 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आज केंद्रिय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आभासी माध्यमातून केली. या महामार्गांची एकूण लांबी जवळपास 262 किलोमीटर असून त्यासाठी 2752 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
गेल्या सहा वर्षांत त्रिपुरामध्ये जवळपास 300 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जोडले गेले आहेत. आज, राज्यात 850 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्रिपुरामध्ये 8,000 कोटी रुपये खर्चून रस्ते बांधणी होत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
लवकरच राज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार आहेत. फेनी पूल आणि उदयपूर अगरतला रस्ता हे ते प्रकल्प आहेत. दोन किलोमीटर दुपदरी पेव्ह्ड शोल्डर उदयपूर अगरतला रस्ता साधारण 750 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढच्या महिन्यात पूर्ण होत आहे. भारताच्या हद्दीत सबरम आणि बांग्लादेशच्या हद्दीत रामगड यांच्यामध्ये असलेला 1.8 किलोमीटर लांबीचा फेनी पूल 129 कोटी रुपये खर्चाचा आहे, हा या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
सबरम आणि चितगॉंगमधील अंतर 75 किलोमीटरचे आहे, आणि या पुलामुळे चितगांव आणि कोलकाता बंदरांवरील वाहतुक सोपी होईल. सबरम जवळ एकीकृत तपासणी चौकी प्रस्तावित आहे, असेही गडकरी म्हणाले.
राज्यासाठी 367 किलोमीटर लांबीचा साधारण 7523 कोटी रुपये खर्चाचे चार प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होण्याच्या प्रक्रियेत आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.