दिल्ली: संपूर्ण देशात एकसमान शिक्षण पद्धती आणि 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एकसमान अभ्यासक्रम लागू करावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च
न्यायालयाने आज फेटाळून लावली.
भाजपचे अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. हा धोरणात्मक निर्णय असून त्याचा निवाडा न्यायालयामार्फत करता येणार नाही असे नमूद करीत न्यायालयाने त्या याचिकेचा विचार करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्याने या मागणीसाठी न्यायालयाकडे येण्यापेक्षा सरकारकडे जावे आणि त्यांनी त्यांना याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यास सांगावे असा सल्लाही कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिला.
देशातील सर्व माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मंडळांचे विलीनीकरण करून एक देश एक शिक्षण मंडळ असे धोरण स्वीकारावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.