मुंबई: केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्राबाबत व श्रमिक ट्रेनबाबत केलेले वक्तव्य अत्यंत दिशाभूल करणारे असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी २२ तारखेला पत्राद्वारे केंद्र सरकारला कळवले होते की, पश्चिम बंगालसाठी २६ तारखेपर्यंत कोणत्याही रेल्वेगाड्या पाठवू नयेत. असे असताना देखील रेल्वे प्रशासनाकडून पश्चिम बंगालसाठी महाराष्ट्रात ३४ रेल्वेगाड्या पाठवण्यात आल्या. त्यामुळे केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राची फसवणूक केली जातेय, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
तसेच महाराष्ट्रात रेल्वे गाड्या पाठवूनही त्या रिकाम्या जात आहेत, अशा प्रकारची खोटी वक्तव्ये केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी करु नयेत व कोरोनाच्या परिस्थितीत राजकारण करु नये, अशी विनंती अनिल देशमुख यांनी केली