नवी दिल्ली: कोरोना विषाणूमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान, संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये राहणाऱ्या 32 हजाराहून अधिक भारतीय नागरिकांनी अबू धाबी येथील भारतीय दूतावासात भारतात परतण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. दुबईस्थित भारतीय समुपदेशक विपुल यांनी गल्फ न्यूजला सांगितले, कि, ऑनलाईन नोंदणी करताना तांत्रिक समस्या येत आहेत. मोठ्या संख्येने नागरिकांनी दूतावासाच्या वेबसाइटवर गर्दी केल्याने तांत्रिक समस्यां निर्माण झाली आहे.
भारतीय दुतावासाने ऑनलाइन आलेल्या अर्जाची अजून पडताळणी केलेली नाही. आलेल्या अर्जाचे विश्लेषण करूनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. अर्जांमध्ये गर्भवती पत्नीसह कारण नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करताना सांगितली आहेत. ऑनलाईन नोंदणी अर्ज अजून काही काळ चालू राहणार आहे. आलेल्या अर्जाची माहिती भारतीय दूतावास देशातील राज्यांना देणार आहे. त्यानंतरच त्यांचा प्रवासाला परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
सुरूवातीच्या टप्प्यात भारतीयांना बाहेर काढण्यासाठी हमी नसल्याची माहिती दुबईस्थित महावाणिज्य दूतावासाने दिली आहे. मात्र, ‘दुबई विमानतळावर अडचणीत असलेले कामगार, वैद्यकीय कारण, गर्भवती महिला, वृद्धना सरकारने सुरू केलेल्या विशेष विमानत प्राधान्य देण्याची शक्यता असल्याचा त्यांचा अंदाज आहे. “भारत सरकारने प्रवासाच्या अटींबाबत काही मार्गदर्शक सूचना दिलेली नाही. त्यामुळे प्रवासाबाबत नागरिकांना अजून थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, केरळ सरकारने गुरुवारी सांगितले की, जगातील 201 देशांमध्ये राहणाऱ्या राज्यातील 3 लाख 53 हजार 46 लोकांनी परतीसाठी नोंदणी केली आहे.