कोल्हापूर : जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.
सध्या करोनोच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने प्राणी-पक्षी मुक्त संचार करत असलेले राधानगरी परिसरात नित्याचे दिसत आहेत. पण पाण्याअभावी त्यांचे हाल होतात. तसेच अनेक प्राणी पाण्यासाठी गावाजवळील शेतात येऊन शेतीचे नुकसान करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे दरवर्षी ही मोहीम व्यापक प्रमाणात नेचर क्लब तर्फे राबवण्यात येते.
बायसनच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून हे पाणवठे स्वच्छ केले. जागतिक वसुंधरा दियानिमित्ताने आजपासून वेगवेगळे पाणवठे स्वच्छ करण्यात आले आहे. वन्यजीव विभागाने परवानगीने लवकरच टॅंकरद्वारे पठारावरील पाणवठ्यात पाणी सोडण्यात येणार आहे. या मोहिमेत गतवर्षी वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती, संस्थांच्या मदतीतून 40 टॅंकर पाणी पाणवठ्यावर टप्याटप्याने सोडण्यात आले होते. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत.