मुंबई – पालघर हत्याकांड प्रकरणी देशभरातून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठत आहे. अशातच आता याप्रकरणावर सर्व स्थरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. असून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करत राग व्यक्त केला आहे.
#palghar Highly condemnable! A shameful reflection of who we are as a society. Maybe a time for reflection.. when you breed a culture Violence & normalise mob justice on streets.. it comes home one day… this is a disease in our society allowed to fester & become a monster!
— Swara Bhasker (@ReallySwara) April 20, 2020
स्वरा ट्विट केले आहे की,’पालघर घटनेचा तीव्र निषेध. ही घटना एक समाज म्हणून आपण कोण आहोत यांचं एक लाजिरवाणं प्रतिबिंब आहे. जेव्हा आपण जमावाकडून रस्त्यावर करण्यात येणाऱ्या न्यायाला सामान्यपणे घेतो, सांस्कृतिक हिंसाचाराला जन्म देतो त्यावेळी असं प्रतिबिंब उमटतं. एक दिवस हे सगळं आपल्या घरापर्यंत येतं. हा आपल्याला समाजाला लागलेला विकार आहे, ज्याला प्रोत्साहन देणं म्हणजे राक्षसी प्रवृत्ती निर्माण करण्यासारखं आहे”, असं ट्विट स्वराने केलं आहे.
दरम्यान, पालघरमध्ये घडलेल्या घटने प्रकरणी अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे. यात फरहान अख्तर, जावेद अख्तर, सुबोध भावे, सुमीत राघवन, अनुपम खेर, जीशान अय्यूब, विवेक रंजन अग्निहोत्री यांचा समावेश आहे.