मुंबईच्या मार्केटमध्ये शेतीमालाची आवक
नारायणगाव – करोना व्हायरल पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भाजीपाला वगळण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल मुंबई, पुणे आदी शहरात पाठविण्याची व्यवस्था सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली आहे.
करोनामुळे जुन्नर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दैनंदिन व्यवहार बंद पडले आहेत. बाजार समितीच्या जुन्नरसह नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हा या उपकेंद्रात अवाक होत आहे.
नारायणगाव उपकेंद्रात धना 1 लाख 71 हजार 300, मेथी 1 लाख 18 हजार 400, शेपू 15 हजार, असे एकूण 3 लाख 4 हजार 700, टोमॅटो – 3050 क्रेट, ओतूर केंद्रात कांदा 20 हजार 329, बटाटा 20724 पिशवी आवक झाली आहे. बेल्हा येथील बैल बाजार बंद केला आहे.
बाजार समितीच्या सर्व केंद्रात शेतकरी, आडतदार, कामगार यांना हात- पाय धुण्यासाठी सॅनिटायझर, साबण याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. खबरदारीसाठी व्यवस्थापक, कर्मचारी समितीच्या आवारात फिरून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे.
मुंबई, नवी मुंबई आदी महत्त्वाच्या शहरात जुन्नर तालुक्यातून भाजीपाला दररोज पाठविला
जात आहे.