नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या बलात्काराचा खटला उत्तरप्रदेशाऐवजी दिल्लीला हलवण्यात यावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. येत्या 2 मार्च रोजी ही सुनावणी होणार आहे.
या प्रकरणातील पीडितेच्या वकिलांनीही कोर्टात सांगितले की आपल्या अशिलाच्या जीवाला उत्तरप्रदेशात धोका असल्याने ही केस दिल्लीत हलवण्यात यावी. उत्तरप्रदेश पोलिसांनी या मुलीला सध्या बंदुकधारी शिपायाचे संरक्षण दिले आहे.
या प्रकरणातील आरोपी चिन्मयानंद सध्या जामीनावर सुटले असले तरी त्यांच्या सुटकेलाही अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.