पाक दुतावासातील अधिकाऱ्याकडे नोंदवला निषेध
नवी दिल्ली – पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका हिंदु मुलीचे तिच्या विवाह प्रसंगी मांडवातूनच अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराबद्दल भारत सरकारने पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्याला पाचारण करून त्याच्याकडे या प्रकरणी कडक निषेध नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा त्वरीत सविस्तर तपास करून संबंधीतांना शिक्षा करावी तसेच पाकिस्तानातील हिंदु अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणीही पाकिस्तान सरकारकडे करण्यात आली आहे.
सिंध प्रांताच्या हला शहरात गेल्या 25 जानेवारीला प्रकार घडला आहे. तसेच पाकिस्तानातील थरपार्कर येथील माता रानी भतियानी या देवीच्या हिंदु मंदिराच्या विटंबनेचाही प्रकार तेथे घडला आहे. त्याप्रकरणीही भारताने दूतावासातील अधिकाऱ्याकडे निषेध नोंदवला आहे.