ढाका : तब्बल दहा वर्षानंतर पाकिस्तानात कसोटी क्रिकेटचे पुनरागमन झाले. श्रीलंकेविरूध्दची कसोटी मालिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापुढे कसोटी सामन्याचे आयोजन त्रयस्थ ठिकाणी केले जाणार नाही, असे क्रिकेट जगताला ठणकावून सांगितले होते.
त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडाळाचे अध्यक्ष एहसान मणी यांना तोंड फुटले होते, मात्र बांगलादेशने पाकिस्तानने दिलेला कसोटी मालिका खेळण्याचा प्रस्ताव धुडकावून मणी यांचेच दात घशात घातले आहेत.
पाकिस्तानात खेळणे भारतात खेळण्यापेक्षा सुरक्षित असल्याचे मणी यांनी म्हटले होते, त्याला चोवीस तासही होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे पाकिस्तान मंडळ तक्रार करणार आहे.