दिल्ली – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी व एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे भारताची फाळणी करू इच्छितात असा थेट आरोप केला असून गांधी ओवैसी व तुकडे-तुकडे गॅंगला भारतामध्ये अराजकता माजवायची आहे असं देखील ते म्हणालेत.
दिल्ली येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना सिंग यांनी राहुल गांधी व असदुद्दीन ओवैसी यांच्यावर थेट आरोप केले असून यावेळी बोलताना त्यांनी, “मुघल व ब्रिटिशांनाही जे जमलं नाही ते राहुल गांधी, काँग्रेस, तुकडे-तुकडे गॅंग व असदुद्दीन ओवैसी हे करू पाहत आहेत. या लोकांना सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोधकरून भारताची फाळणी करण्याची इच्छा असून देशभरामध्ये नागरी युद्ध भडकवण्याची त्यांची योजना आहे.” असं वक्तव्य केलं आहे.
Union Minister Giriraj Singh in Delhi: What Mughals and Britishers could not do, that Rahul Gandhi, Congress, tukde-tukde gang and Owaisi want to do. They want to divide India. They want a civil war in India. pic.twitter.com/QF79LP5bLU
— ANI (@ANI) December 26, 2019