नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील अडीच लाख अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्याचे योजले आहे. मात्र हे काम पुढील पाच वर्षांच्या टप्प्यामंध्ये केले जाणार आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे. देशात सध्या 13 लाख 77 हजार अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. त्यात 12 लाख 80 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर तेथे सुमारे 11 लाख 60 हजार मदतनीस कार्यरत आहेत.
आधुनिकीकरणाची ही योजना अजून नियोजनाच्या पातळीवरच आहे त्यासाठी विविध स्तरावर चर्चा केली जात आहे असे या मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले. योजनेचे आराखडा संमत झाल्यानंतर पुढील वर्षापासून हे काम हाती घेतले जाणार आहे. अंगणवाड्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर यात विशेष लक्ष दिले जाणार आहे असे संबंधीत सूत्रांनी सांगितले.सध्या 3 लाख 62 हजार 940 अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत तर 1 लाख 59 हजार 568 अंगणवाड्यांमध्ये पीण्याच्या पाण्याची सोय नाही. अशा मुलभूत सोयीही त्यात केल्या जाणार आहेत.