नवी दिल्ली – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. एका आरोपीने आपल्यावरील शिक्षेचा फेरविचार केला जावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने स्वीकार केली आहे. याचिकेवरील १७ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र आता १८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या आईनं न्यायालयाकडे आरोपींविरोधात डेथ वॉरंट काढण्याची मागणी केली होती.
निर्भयाच्या आईने म्हंटले कि, आरोपींनी खूप मजामस्ती करुन घेतली आहे. आता लवकरात लवकर यांचे डेथ वॉरंट काढा आणि फाशीची शिक्षा जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या कि, जर आपली व्यवस्था दुबळी नसती तर आरोपीचे वकील व्यवस्थेला आव्हान देऊ शकले नसते. त्यांनी आमची अशी खिल्ली नसती उडवली. जेव्हा आरोपी गुन्हा करतात तेव्हा आपला देश आंबेडकर आणि गांधींचा देश नसतो का ? गुन्हा झाल्यावरच सगळ्यांना ते का आठवतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: When we have fought for 7 years, we can wait for another week. On 18 December, their (convicts in the case) death warrant will be issued. https://t.co/M3BSNvIw6g pic.twitter.com/BZB2hnJeh4
— ANI (@ANI) December 13, 2019
तसेच जेव्हा एखाद्या लहान मुलीवर बलात्कार होतो तेव्हा सगळंच संपून जातं. पण जेव्हा शिक्षेची वेळ येते तेव्हा मानवाधिकारच्या घोषणा देत अनेक संस्था उभ्या राहतात, अशी खंतही निर्भयाच्या आईने बोलून दाखवली.
हैद्राबाद आणि उन्नाव प्रकरणावर बोलताना निर्भयाच्या आई म्हणाल्या कि, सात वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही. आजही मुलांना जाळून मारलं जात असून प्रशासन डोळे बंद करुन बसलं आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, निर्भया प्रकरणातील पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, मुकेश सिंह आणि विनय शर्मा हे चार दोषी गेल्या दोन वर्षांपासून भोगत आहेत आणि चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Delhi Court adjourns hearing in Nirbhaya rape case till Dec 18
Read @ANI Story |https://t.co/whUhmlrhF8 pic.twitter.com/WlmApVkViq— ANI Digital (@ani_digital) December 13, 2019