नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशात फूट पाडणारे आणि भेदभाव करणारे आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पक्षात लढणाऱ्या सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करत आहे. असे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त शिरीन दळवी यांनी सांगितले.
शिरीन दळवी या लखनऊ येथील प्रसिद्ध उर्दू दैनिक ‘अवधनामा’च्या मुंबई आवृत्तीच्या माजी संपादक आहेत. राज्य सरकारकडून त्यांना 2011 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले यावर मी खूप दुःखी आहे. असेही त्या म्हणाल्या.
हा देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. या अमानवीय विधेयकाचा निषेध करताना मी साहित्य अकादमी पुरस्कार 2011 परत देत असल्याची घोषणा त्यांनी केली.