मुंबई: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या भागातील कापूस, संत्री, सोयाबीन आणि धानाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण विदर्भात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यवतमाळ जिल्हा तर शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे.
विदर्भ विकासाचा अनुशेष १ लाख कोंटीवर गेलाय. त्यामुळे सरकारने विदर्भाला १० हजार कोटींचे पॅकेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे. तसेच बागायतदार शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी ७५ हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही गजभिये यांनी केली आहे.