लासुर्णे परिसरातील शेतकऱ्यांना फटका
लासुर्णे- इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आडसाली लागवड केलेल्या ऊसाचे पिक धोक्यात आले आहे. काही शेतकऱ्यांना उसाची दुबार लागवड करावी लागणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील लासुर्णे, बोरी, बेलवाडी परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे.
नीरा डावा कालवा भाग व इतर भागातील शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड केली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे व नीरा डाव्या कालव्याच्या पाझरामुळे कालवा परिसरातील ऊस गेल्या एक महिन्यापासून पाण्यात आहे. उसाच्या संपूर्ण सरीमध्ये पाणी साचल्याने ऊस जळून जाऊ लागला आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार लागवड करावी लागणार आहे.