शिक्रापूर, – युवा आणि तरुण बेरोजगारांसाठी एक लाख कोटींची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागू केली आहे. त्यामुळे रोजगाराला तर फायदा होणार आहेच; शिवाय उत्पादन, व्यवसाय, उद्योगाला हातभार लागणार आहे. त्यासाठी मोदींना तिसर्यांदा प्रंतप्रधान म्हणून बघण्यासाठी त्यांच्याच विचारांचा खासदार संसदेत गेला पाहिजे. म्हणूनच मला आपले पाठबळ द्यावे असे आवाहन शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खैरेनगर (ता. शिरुर) येथे केले.
आढळराव पाटील म्हणाले की, आरोग्य, स्वच्छता व महिलांच्या दृष्टीने अनेक योजना मोदीजींनी राबवल्या. त्यामुळे राज्ये, देश सक्षम झाला. हे नाकारता येणार नाही. देशाच्या सर्वांगिण विकासासाठी पुन्हा त्यांना पाठबळ द्यावे लागेल. यात तसूभरही कमतरता आपण ठेवता कामा नये. गेली पाच वर्षे पदावर नसतानाही मी मतदारसंघासाठी निधी आणला तर पदावरच्या खासदारांनी तो परत पाठवला.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले की, मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. त्यांच्या विचारांचा शिलेदार म्हणून आपण शिवाजीराव आढळराव पाटील यांना लोकसभेत पाठवले तरच आपल्या स्थानिक विकासाला हातभार लागेल. शेतकरी आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लागतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभूळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, उद्योजक प्रदीप साकोरे, भाजपा तालुकाध्यक्ष मारुती शेळके, उपाध्यक्ष भगवानराव शेळके,
पंचायत समिती सभापती राजेंद्र रासकर, उद्योग आघाडी अध्यक्ष रविंद्र गायकवाड, खैरेनगर सरपंच नवनाथ शिंदे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच संदीप खैरे, तुकाराम शिंदे, बाळासाहेब खैरे, विलास खैरे, राहुल क्षीरसागर, राजेंद्र खैरे, अरुण खैरे, लक्ष्मण खैरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भागातील 12 गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे; मात्र हाच प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणुकीला उभा आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मी हा प्रश्न धसास लावणार आहे. त्यासाठी आपण मला पाठबळ द्यावे. -शिवाजीराव आढळराव(महायुतीचे शिरुरचे उमेदवार)