Reserve Bank Of India| रिझर्व्ह बँकेकडून दोन बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन बँकांपैकी एक बँक मुंबईतील आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई मुंबईतील सर्वोदय सहकारी बँक आणि उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकांवर कारवाई केली आहे. आर्थिक अनियमितता आणि ढासळती आर्थिक परिस्थिती असलेल्या बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या बँकांमधून आता कर्ज मिळणार नाही. तसेच ठेवीदारांना केवळ १० ते १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. आरबीआयच्या या कारवाईचा थेट परिणाम या बँकांच्या खातेदारांवर होणार आहे. आरबीआयने सोमवारी नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, प्रतापगड (उत्तर प्रदेश) वर अनेक निर्बंध लादले आहेत, ज्यात कर्जदाराची बिघडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता ग्राहकांसाठी 10,000 रुपये काढण्याची मर्यादा समाविष्ट आहे. तर मुंबईतील सर्वोदय सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले, ज्यात ग्राहकांसाठी 15,000 रुपये काढण्याची मर्यादा समाविष्ट आहे. Reserve Bank Of India|
त्याबरोबरच पात्र ठेवीदार, केवळ विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून आपल्या ठेवींची पाच लाखांपर्यंतची विमा दावा रक्कम प्राप्त करू शकतील. सर्वोदय सहकारी बँक आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर बँकेवर विनियमन अधिनियम, १९४९ च्या कलम ३५ अ अन्वये लागू करण्यात आलेले निर्बंध १५ एप्रिल २०२४ रोजीचा व्यवहार समाप्त झाल्यापासून लागू करण्यात आले आहेत.
याबाबत रिझर्व्ह बँकेने सांगितले की, आता सर्वोदय सहकारी बँक रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कुठलंही नवं कर्ज देऊ शकणार नाही. तसेच कुठल्याही कर्जाचं पुनर्गठन, नुतनीकरण होणार नाही. तसेच बँकेमध्ये कुणालाही ठेवी ठेवता येणार नाहीत. तसेच कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही. Reserve Bank Of India|
याशिवाय बँकेतील बचत आणि चालू खात्यांमध्ये ठेवी असलेले ठेवीदार १५ हजार रुपयांहून अधिकची रक्कम काढू शकणार नाहीत. निर्बंध १५ एप्रिलपासून सहा महिन्यांपर्यंत लागू राहतील. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल.