Lok Sabha Election 2024 । मोदी सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री आतिशी यांनी केलाय. दिल्लीत निवडून आलेल्या सरकारविरोधात षडयंत्र रचले जात असल्याची माहिती त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
शुक्रवारी, 12 एप्रिल रोजी आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 20 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात विभव कुमारवर कारवाई करण्यात आली होती. दिल्लीत अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या होत नाहीत. अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2024 । केजरीवाल सरकारविरोधात षडयंत्र रचले जात आहे.
दिल्लीतील लोक आम आदमी पार्टीला पसंत करतात, असा आतिशीचा दावा आहे. मात्र, दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचले जात आहे. भाजपचे केंद्र सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती होत नाही. अनेक विभाग रिक्त असून, तेथे अधिकारी उपस्थित नाहीत.
दिल्लीचे एलजीही कोणतेही कारण न देता गृहमंत्रालयाला पत्र लिहून सरकार काम करत नाही. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या स्वीय सचिवालाही विनाकारण हटवले जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी सुरू असल्याचे हे सर्व संकेत आहेत. असेही आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री आतिशी म्हणाल्या आहे.
हे वाचले का ?सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाइट; 1.83 लाखांचा गंडा