Sachin Pilot On Bjp : वर्ष २०१९ मध्ये जनतेने मोठ्या विश्वासाने भाजपाला सत्ता दिली. मात्र सलग दोन वेळी केंद्रात सत्तेत येऊनही भाजप आजही मंदिर-मशिद वादाची टेप वाजवते आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ आहे की नाही, असाच प्रश्न पडतो, असे प्रतिपादन राजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले आहे.
सीकर लोकसभा मतदारसंघातील नीमकथाना येथे ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार अमर राम यांच्या समर्थनार्थ सभेला पायलट यांनी संबोधित केले. यावेळी पायलट यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांचा एमएसपी रद्द केला, शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे केले आणि निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. आमच्या सरकारने २० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, जगात कुठेही अस्तित्वात नसलेला मनरेगा कायदा केला. | Sachin Pilot On Bjp
पायलट पुढे म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यापासून आज देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे. भारतीय जनता पक्षाने या देशावर अशा प्रकारे राज्य केले आहे की ते आपले प्रजासत्ताक, आपली लोकशाही, आपल्या घटनात्मक संस्थांना उद्ध्वस्त करत आहेत. म्हणूनच ही निवडणूक महत्त्वाची आहे. ही निवडणूक येत्या काळात देशाची दिशा आणि स्थिती ठरवणार आहे. | Sachin Pilot On Bjp
भाजपचे लोक फक्त हिंदू-मुस्लिम राजकारण करतात, भाजपचा कोणताही नेता रोजगारावर बोलत नाही, फक्त मंदिर-मशीद, भारत-पाकिस्तान यावर बोलतो. भाजपाने एकदा रस्त्यावर उतररुन सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घ्यायचा प्रयत्न तरी करावा, असा सल्लाही पायलट यांनी भाजपाला दिला. | Sachin Pilot On Bjp