Narayan Rane VS Vaibhav Naik| रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. मागील काही दिवसापासूंन या मतदार संघातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. यातच आता शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांनी येथून माघार घेतल्याची देखील चर्चा आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
नारायण राणेंनी दम दिल्याने किरण सामंत यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्याचा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेमधून शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांना कशा पद्धतीने दम दिला हे कोकणातील जनतेने पाहिले. दम देऊन किरण सामंत हे उमेदवारी मागे घेऊ शकतात, पण जनता अशा धमक्यांना भीक घालणार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला आहे. Narayan Rane Vs Vaibhav Naik|
किरण सामंत सोशल मीडिया पोस्ट
दरम्यान, नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत किरण सामंत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे अगदी आक्रमकपणे व्यक्त झाले. तर दुसरीकडे, किरण सामंत यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निर्णय घेतल्याचे किरण सामंत यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
किरण सामंत यांनी केलेली माघार घेतल्याची पोस्ट आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीतील पेच सुटला असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा:
पक्ष प्रवेश अन् काही तासांत उमेदवारी जाहीर; संभाजीनगरमध्ये एमआयएमला शह देण्यासाठी आंबेडकरांची खेळी