श्रीरामपूर,(प्रतिनिधी)- सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू असून कारखान्यांकडे राज्यातून व राज्याबाहेरून ऊस तोडणीकरीता मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊन येत असतात. ऊसतोडणी मजुरांना अशोक कारखान्यामार्फत अनेक सोयीसुविधा पुरविल्या जात आहे.
महिला ऊसतोडणी मजुरांचे कुठल्याही प्रकारचे शोषण होऊ नये, याकरीता अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली महिला समिती स्थापन करण्यात आली. महिला समितीच्या अध्यक्षपदी कारखान्याच्या संचालिका हिराबाई ज्ञानदेव साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याअंतर्गत अशोक कारखान्याचे टाकळीभान येथील ऊस तोडणी मजुरांच्या अड्ड्यावर हिराबाई साळुंके यांचे अध्यक्षतेखाली महिला ऊस तोडणी मजुरांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.शामल उंडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, संचालक यशवंत रणनवरे, दत्तात्रय नाईक, श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, सुनील बोडखे, मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी, उप शेतकी अधिकारी प्रदीप शिंदे, सरपंच अर्चना रणनवरे, अर्चना पवार, शिवाजी पवार, दत्तात्रय बोडखे, योगेश लेलकर, योगेश बनकर, जालिंदर शेळके, ज्ञानदेव चौधरी आदींसह महिला ऊस तोडणी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.