Sanjay Raut । लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडीत वेग आलाय. मात्र या सगळ्यात वंचित आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा काही केल्या सकारात्मक होताना दिसत नाही. त्यातच वंचितचा कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, वंचितने आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला डावलून थेट आणि केवळ काँग्रेसची चर्चा सुरू केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी यांनी यासाठी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या पक्षच्या कोणत्याही ७ उमेदवारांना पाठिंबा देऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही, असे म्हटले आहे. त्याच्या याच वक्तव्यावर मविआकडून प्रतिक्रिया आलीय.
हे प्रकाश आंबेडकरांचं रिडल्स इन पॉलिटिक्स Sanjay Raut ।
शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी,”प्रकाश आंबेडकरांनी एकट्या काँग्रेसला पत्र पाठवलं आणि आणि त्यांच्याकडे सात जागांची यादी मागितली आहे. त्या सात जागांवर पाठिंबा देणार वगैरे… मग उरलेल्या जागांवर त्यांचा (वंचितचा) उमेदवार उभा करून ते काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार आहेत का? प्रकाश आंबेडकर असे गुंते निर्माण करतात, वेगवेगळी कोडी टाकतात. हे प्रकाश आंबेडकरांचं रिडल्स इन पॉलिटिक्स प्रकरण आहे.
कुठलाही प्रस्ताव कधीच अंतिम नसतो Sanjay Raut ।
ठाकरे गटातील खासदार म्हणाले, आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला आहे आणि यापुढेही करू. आमच्यात हुकूमशाहीविरोधात लढण्याची एकवाक्यता आहे. आम्ही संविधान रक्षणासाठी एकत्र यायचं ठरवलं आहे. देशात संविधानाची रोज हत्या होतेय. त्यामुळे मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संविधानाची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील. आम्ही वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, उद्या शरद पवार, नाना पटोले आणि आम्ही इतर काहीजण बसून यावर चर्चा करणार आहोत. त्या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. कुठलाही प्रस्ताव कधीच अंतिम नसतो. त्यावर चर्चा होत असतात.