अहमदनगर, (जामखेड) – प्रलंबित व दावा दाखल पूर्व प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ६ हजार ६४३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. यातून तडजोडीच्या प्रकरणांमध्ये २ कोटी ०३ लाख १७ हजार ३१८ रुपयांची वसुली झाली.
जामखेड न्यायालयाने अहमदनगर जिल्हयामध्ये मोठ्या प्रकरणाचा निपटारा करून प्रथम क्रमांक पटकावला.सर्वाधिक प्रकरणे निकाली काढत वाद मिटल्याने पक्षकारांच्या चेहऱ्यावर हास्य अन् समाधान होते.
विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन रविवारी (ता.३) करण्यात आले होते.राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश व्ही आर. पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून सुरु करण्यात आले. यावेळी.वि. सेवा समीतीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी, यांनी न्यायालयातील वादविवाद आपापसात मिटवुन घेण्याबाबत उपस्थीत पक्षकारांना आवाहन केले.
लोकन्यायालयात प्रकरण निकाली काढल्याने कोणाचाही पराभव अथवा कोणाचाही विजय होत नाही असे मार्मीक वक्तव्य त्यांनी त्यावेळी केले. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, बँक व पतसंस्था यांना दाखलपुर्व प्रकरणांचाही निपटारा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या आवाहन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सकारत्मक प्रतिसाद देऊन तब्बल ६ हजार ६४३ प्रकरणे निकाली काढण्यात आले विधी प्राधिकरणाचे सचिव गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि वकील संघाचे अध्यक्ष अॅड. ए. के. शेख, यांच्यासह सर्व अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी प्रकरणे तडजोडीसाठी परिश्रम घेतले.लोकन्यायालय यशस्वी केल्याबद्दल वि. सेवा समीतीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश, व्ही. व्ही. जोशी, यांनी वकील बांधवांचे व न्यायालयीन कर्मचा-यांचे अभिनंदन केले.