नगर, – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप मधील खा. सुजय विखे पाटील व माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यातील अंतर्गतवाद उफाळून आला आहे. त्यात ‘कांदा निर्यातबंदी’ची माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चांगलीच फोडणी दिली आहे. त्यामुळे आता पक्षांतंर्गत वाद ही चव्हाट्यावर आल्याने आगामी निवडणूकीचे तोंडावर काय घडामोडी घडणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्य़ान, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बरोबर दोन वेळा झालेली पडद्यामागची चर्चा खरोखरच निर्यात बंदी उठविण्याबाबत होती का? अशी संशयाची पाळ आता भाजपच्या नेत्यांबरोबरच शेतकरी, तसेच नेत्यंच्या मनात चुकचुकत आहे. विखे यांच्या निर्यात बंदीच्या घोषणेवर शेतकरी संघटनेचे अनिल घनवट यांनी ही टीका करून विखे यांची कानउघडणी केली आहे.
त्यामुळे केंद्र सरकार नव्हे तर ‘विखे’ पुरस्कृत असलेल्या या निर्यात बंदीची घोषणा शेतकर्यांच्या दृष्टीने केवळ ‘ गाजर दाखविले असल्याची टिका राजकीय वर्तुळातून उमठू लागली आहे. तर आता विखे विरोधकांच्या मनातही विखे द्वेषाची खदखद बाहेर येत असून त्यांच्या विखे विरोधकाला उकळी फूटू लागली आहे.
दरम्य़ान कांदा निर्यात बंदीविषयावरून भाजप पक्षांतर्गतच मतभेद उघड झाल्यानंतर खासदार विखे यांनी तात्पुरती सारवासारव केली खरी मात्र, माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी विखेंची कांदा निर्यात बंदीवरून चांगलीच खरडपट्टी केल्याने विखे यांना शिंदेची टीका चांगलीच झोंबली आहे.
ही निर्यातबंदी नव्हे तर शेजारर्यांना मदतीचा हात!
केंद्र सरकारने शेजारील कमकुवत देशांना ५४ हजार टन कांदा निर्यात करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. हा कांदा दि.३१ मार्च पर्यत व्यापार्यांना निर्यात करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्यांचा शेतकर्यांना अजिबातच फायदा होणार नसल्याचे अधोरेखित झाले आहे.
दरञान निर्यात बंदीच्या विखे यांच्या घोषणांंच पितळ उघड पडल्यानंतर अनेक ठिकाणी बाजार समितीत होणार्या लिलावात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. यावरही सावरासावर करतांना ही कांदा निर्यात नाफेड मार्फत होणार आसल्याचेविखे यांनी स्पष्ट केले आहे.