Sharad Pawar on NCP Crisis | अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला दिलासा मिळू शकलेला नाही.
मात्र, याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेची तपासणी करण्यास तयार असल्याचे न्यायालयाने सांगितले. तसेच अजित पवार गटाला (Ajit Pawar) आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावून 2 आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
आता या प्रकरणी पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी निश्चित केली आहे. या सुनावणीनंतर शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या दोन्ही नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर समाधान व्यक्त केलं. त्यानंतर आता स्वत: शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवर (X) प्रतिक्रिया दिली आहे. हा लोकशाहीचा मोठा विजय आहे, अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
शरद पवार यांचे ट्विट Sharad Pawar on NCP Crisis |
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये, असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला. आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे.’
On the auspicious day of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, the Hon’ble Supreme Court has granted us interim relief against the order of the Election Commission of India.
It is a win for the voters as Hon’ble Supreme Court observed that the voters of the country should not be…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 19, 2024
“अन्यथा माघार अन् सुट्टी दोन्ही…. ” ; आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगेंचा थेट इशारा