मुंबई – एआय मधील संधीला महाराष्ट्रात गती प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार आणि गुगल दरम्यान सहकार्य करार (एमओयू) वर स्वाक्षरी करण्यात आली. करारावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुगल इंडियाचे कंट्री हेड संजय गुप्ता यांनी आज पुण्यातील गुगलच्या कार्यालयात स्वाक्षरी केली.
या सहकार्य करारा अंतर्गत महाराष्ट्र सरकारला गुगलच्या एआय नेतृत्वाच्या लाभासह तंत्रज्ञानातील कौशल्ये प्राप्त होऊन जमिनीच्या दस्तांचे व्यवस्थापन, आजार ओळखणे, ग्रामीण पर्यावरणाचे व्यवस्थापन आणि एआय अपस्कीलिंग सह अन्य संधी उपलब्ध होणार आहेत.महाराष्ट्र सरकार कडून आयआयआयटी नागपूर येथे अत्याधुनिक एआयसेंटर ऑफ एक्सेलन्स ची स्थापना करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य हे एआय वर आधारीत विकास करण्यासाठी वचनबध्द आहे आणि गुगल या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. गुगल इंडियाचे कंट्री हेड संजय गुप्ता यांनी सांगितल की, एआयचा उपयोग करुन कौशल्य, आरोग्य, कृषी आणि शाश्वतता या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.
गुगल तर्फे राज्यात सक्षम एआय इकोसिस्टम तयार करुन स्टार्ट अप मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि डेमो डेजचे आयोजन गुगल तज्ञांसह क्षेत्रातील दिग्गजांकडून करण्यात येणार आहे. यामध्ये तंत्रज्ञान, उत्पादन विकास, व्यवसाय धोरण आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे.
गुगलच्या एआय स्टार्ट अप प्रोग्रम च्या माध्यमातून पात्र व्हीसी फंडेड एआय स्टार्टअप्स ना क्लाऊड क्रेडिट्स, टेक्निकल ट्रेनिंग आणि व्यवसायिक सहकार्य करुन त्यांच्या वाढीला गती देण्यात सहकार्य केले जाणार आहे.
गुगल कडून सरकारच्या नेतृत्वाखालील कौशल्य प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य करण्यात येणार असून याकरता सरकारी संस्थांकडून अधिक मागणी असलेल्या कौशल्य कोर्सेसना यूट्यूबवर सुरु करण्यात मदत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकार आणि गुगल तर्फे मानवकेंद्रीत एआयचा वापर आरोग्य क्षेत्रात कशा प्रकारे करता येईल याचा अभ्यास करुन उपयुक्त मेडिकल एआय उपकरणांच्या वापराने मोठ्या स्तरावर होणारा परिणाम अभ्यासला जाणार आहे. गुगल कडून राज्याला ग्रीकल्चरल लँडस्केप अंडरस्टॅन्डिंग (एएलयू) एपीआय चा वापर करण्यास सक्षम करेल ज्यामुळे राज्याला कृषी जमीन, जमिनीचा आकार, पाण्याचे स्त्रोत आणि वैयक्तिक स्तरावरील अन्य भौगोलिक घटक हे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन शोधणे सोपे जाणार आहे.