Nitin Gadkari : देशातील सध्याचे राजकीय वातावरण आणि वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या बदलत्या विचारधारेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच संधीसाधू नेत्यांच्या सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवण्याच्या इच्छेवर देखील चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी चांगले काम करणाऱ्यांना कधी सन्मान मिळत नाही असे म्हटले आहे.
खासदारांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देण्यासाठी एका माध्यम समूहाने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी संधीसाधू नेत्यांच्या सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवण्याच्या इच्छेवर चिंता व्यक्त करत विचारधारेचा ऱ्हास होणे ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नसल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले की, विचारधारेवर ठाम असलेले अनेक नेते आहेत, मात्र त्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे.असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, “मी नेहमी गमतीने म्हणतो की, सत्तेत कोणताही पक्ष असो, एक गोष्ट निश्चित आहे की, चांगले काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही आणि जो वाईट काम करतो त्याला कधीही शिक्षा होत नाही.” असे म्हणत त्यांनी म्हटले आहे.
तसेच “आपल्या विचारसरणीच्या जोरावर ठामपणे उभे राहणारे लोक आहेत, मात्र अशा लोकांची संख्या कमी होत आहे. विचारसरणीची घसरण लोकशाहीसाठी चांगली नाही.” ते म्हणाले, “ना उजव्या विचारसरणीचे, ना डाव्या पक्षाचे, आम्ही प्रसिद्ध संधिसाधू आहोत, काही लोक असे लिहितात आणि सर्वांना सत्ताधारी पक्षाशी जोडले जावेसे वाटते.” असे म्हणत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
यावेळी गडकरींनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या बोलण्याच्या कलेची प्रशंसा केली आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या वागण्या, साधेपणा आणि व्यक्तिमत्त्वातून खूप काही शिकल्याचे सांगितले. ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयींनंतर मी ज्या व्यक्तीने सर्वात जास्त प्रभावित झालो ते जॉर्ज फर्नांडिस.
गडकरींनी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचेही कौतुक केले, ज्यांना नुकतेच मरणोत्तर भारतरत्न देण्यात आले आणि अशा लोकांनी देशाची लोकशाही मजबूत केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी (ठाकूर) ऑटो-रिक्षातून प्रवास केला आणि त्यांची प्रकृती अगदी सामान्य होती.” अशा लोकांकडून राजकीय नेत्यांनी प्रेरणा घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.