दिवसा एका नेत्याचा निष्ठावान कार्यकर्त्या राञी विरोधी नेत्याच्या फडात जावून वाजवतोय डबल ढोलकी!
नेवासा (राजेंद्र वाघमारे)- हल्लीच्या युगात राजकारणात सध्या पक्षनिष्ठा प्रेम आपुलकी – श्रद्धा आणि भावना हा विषय कालानुरुप राजकारणातून कालबाह्य होत चालल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता राजकारणात कोणी – कोणाचा गुरु आणि कोणी कोणाचा चेला नसल्यामुळे “गुरुवरच विद्या” उलटविण्याच्या घटना सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील घडामोडींवरुन सप्रमाणात सिद्ध होतांना दिसून येत आहे.
त्यामुळे आता कार्यकर्त्यांनीही राजकारणात मोठी सावध भूमिका घेत आपल्या नेत्यांचीच जर त्यांच्या पक्षावर श्रद्धा-निष्ठा आणि प्रेम नसेल तर आपण तरी का? फुकटचे बाहूले बनण्यात काय अर्थ? असा एकंदरीत निष्कर्ष काढून आता राजकारणात नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच जादा वरचढ भरतांना दिसून येत असून दिवसा एका नेत्याचा हा निष्ठावान कार्यकर्ता राञी दुसऱ्या पार्टीच्या फडात जावून आपल्याच नेत्यांच्या कृष्णकृत्याचा पाढा वाचत असल्यामुळे आता कार्यकर्त्यांनीही राजकारणाचा ट्रॅक बदलून ‘डब्बल ढोलकी’ वाजविण्यास सुरुवात केलेली असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आता आपला राजकारणातील ट्रॅक बदलला असल्याचे सर्वञच दिसून येत आहे.
त्यामुळे नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच आता वरचढ भरतांना दिसत आहे त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचे रंग बदलण्याच्या राजकिय व्युहनितीमुळे नेत्यांनाही आता चांगलीच धडकी भरतांना दिसून येत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत सध्या सुरु असलेली न्यायालयीन लढाई आणि या पक्षांच्या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे आपणच कसे या राजकिय पक्षाचे मालक अाहोत हे पटवून देण्यासाठी सुरु झालेल्या या स्पर्धेमुळे सामान्य माणूस हा राजकारणाचा खेळ निमुटपणे पहात बसतांना दिसून येत आहे. त्यामुळे आता कालानुरुप पक्षनिष्ठा – श्रद्धा आणि आपुलकी हा विषय आता राजकारणातून हद्दपार झाल्यामुळे आता कार्यकर्तेही सावध भूमिका घेवून राजकारणात “डब्बल ढोलकी” वाजविण्यास सुरुवात करतांना दिसून येत आहेत.
त्यामुळे दिवसा एका नेत्याचा निष्ठावान समजला जाणारा कार्यकर्ता सरपंच,आणि पदाधिकारी एका राञीत दुसऱ्याच नेत्यांच्या तंबूत डेरेदाखल होत असल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतांना दिसून येत आहे.
नेत्यांचीच जर आपल्या राजकिय पक्षावर श्रद्धा नसेल तर आपणच का या नेत्यांचे बाहूले होवून फिरायचे ?असे आता डबल ढोलकी वाजविणाऱ्या कार्यकर्त्यांकडून अगदी स्पष्टपणेच बोलले जात आहे.
त्यामुळे आपल्या नेत्यांपुढे केवळ हजेरी लावून पुन्हा दुसऱ्या फडात आपले राजकिय जुगाड कसे बसेल ? याचा राजकिय अंदाज आणि आखाडा बांधण्यासाठी डोमकावळे म्हणून प्रसिद्ध असलेले पुढारी आता केवळ पक्ष-निष्ठा प्रेम आणि आपुलकीच्या फंदात न पडता आपले राजकिय जुगाड बसविण्यात येत असल्याचे सध्या राजकिय मैदानात दिसून येत आहे.