Devendra Fadnavis – अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेते भाजप सरकारवर टीका करत आहे. अशात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगत राम मंदिर सोहळा राजकीय कार्यक्रम होऊ नये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
🕦 11.20am | 20-1-2024 📍 Thane | स. ११.२० वा. | २०-१-२०२४ 📍 ठाणे.
LIVE | रामायण महोत्सव@Vinay1011#Ramayan #Karsevak #JaiShriRam #Maharashtra #Ayodhya https://t.co/KEzhbDrirb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 20, 2024
दरम्यान, ठाण्यात रामायण महोत्सवाचं आयोजन देवेंद्र फडणवीस म्हणाले,’ रामराज्य म्हणजे सुशासन, पारदर्शकता आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचारच. कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, कर्मभाव, प्रयत्नवाद म्हणजे रामराज्य. रामराज्य म्हणजे की पंतप्रधान मोदींनी जी संकल्पना मांडली आहे ती दहशतवाद मुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, घराणेशाही मुक्त भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत या रामराज्याच्या संकल्पना आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले ,’आज या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्जन शक्ती आहेत, दहशतवाद माजवत आहेत त्यांचा नायनाट करत आहे. आवश्यकता पडल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकही केले जातात आणि ३७० कलम हटवून दुर्जन शक्तींना सांगितलं जातं की भारताचे तुकडे तुम्हाला करु देणार नाही. रामराज्याची संकल्पनेवरच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच करुन दाखवलं. कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता गरीब कल्याणाचं काम केलं. राजीव गांधी म्हणायचे मी एक रुपया दिल्लीहून पाठवला की १५ पैसेच गरीबाला मिळतात बाकीचे पैसे व्यवस्था खाऊन टाकते. मात्र मोदींनी अशी व्यवस्था उभी केली जी गरीबाच्या खात्यात संपूर्ण एक रुपया जाईल.
मोदींच्या राज्यात सरकारने दृढतेने सांगितलं की रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या आहेत तीच रामजन्मभूमी आहे. आम्हाला तिथेच मंदिर सापडलं आहे, आम्हाला तिथेच ६४ खांब मिळाले. त्याच ठिकाणी मूर्तीही सापडल्या आहेत. त्याच ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर आम्ही बनवणार हे सांगणारे मोदीजी होते आणि राम मंदिर समिती होती. त्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहोत. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला बोल केला.