Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. आज राज्यात ६२ टक्के आरक्षण आधीपासूनच आहे. आता आणखी आरक्षण देण्यासाठी कायदेशीर मार्ग तपासावे लागतील. पण काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्यासंबंधी घोषणा करत आहे, असे अजित पवार म्हणाले होते. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “तुम्ही आधी मराठा आरक्षणावर काहीच बोलत नव्हता ते बरं होतं. तुम्ही शांत आहात यावरुन तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहात असं लोकांना वाटत होते. तुमचं बारामतीवर किती प्रेम आहे हे लोकांना माहिती आहे. तुमच्या पोटातलं ओठावर आले. मराठ्यांचे वाटोळे करण्याची जी तुमची पूर्वीपासून सवय आहे ती पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केले. तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडले. हे कालपासून तुमच्या बोलण्यातून सिद्ध व्हायला लागले,” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
“तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडले. हे कालपासून तुमच्या बोलण्यातून सिद्ध व्हायला लागले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काहीही झालं तरी येत्या २० जानेवारीला आम्ही मुंबईत धडकणारच, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला होता. यावर “मुंबईत येताना कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई करणार,” असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
त्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “शेवटी त्यांनी पोटातले ओठात आणलेच. पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केलं. अजित पवार पहिल्यापासून मराठ्यांच्या मूळावर उठले आहेत. आम्हाला हे बोलायचे नव्हते. तुम्ही मौन धरलं होते. त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी आहेत असं वाटलं होते. परंतु तुमचे विचार समोर आलेत. पहिल्यापासून तुम्ही दहा पाच लोकं सोबत ठेवली आणि कोट्यवधी मराठ्यांचे वाटोळे केले. तुमचा पण पूर्ण होतोय का बघू. मराठ्यांवर तुम्ही कारवाई करून दाखवा”, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिला.