नवी दिल्ली – बांगलादेशात रोहिंग्या मुस्लिमांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या छावणीला काल रात्रीच्या सुमारास आग लागली आणि सुमारे एक हजार झोपड्या जळून खाक झाल्या. ही छावणी बांगलादेशाच्या दक्षिणेच्या किनार् याजवळील कोक्स बझार जिल्ह्यात उभारण्यात आली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे हजारो रोहिंग्ये बेघर झाले आहेत, असे अग्निशामक दल आणि संयुक्त रा,ट्राच्या अधिकार् यांनी म्हटले आहे.
ही आग रविवारी पहाटेच्या सुमारास लागली आणि झपाट्याने पसरली. त्यामुळे शेकडो महिला आणि लहान मुले आपल्या चीजवस्तू घेऊन जवळच्या मोकळ्या मैदानाच्या दिशेने धावले. संयुक्त रा,ट्राच्या मदत केंद्राच्यावतीने आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली गेली. या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जातो आहे.
ही आग नक्की कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. मात्र चुलीमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
या छावणीमध्ये .यापूर्वीही अशाप्रकारे आग लागली आहे आणि अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. मार्च महिन्यात अशाचप्रकारे लागलेल्या आगीत हजारो झोपड्या जळून गेल्या होत्या.
गेल्या दशकभरात लक्षावधी रोहिंग्यांनी म्यानमारमधून बांगलादेशात आश्रय घेतला आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये म्यानमारच्या लष्कराने रोहिंग्यांना हुसकावून लावल्यामुळे सुमारे साडे ७ लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. २०२१ मध्ये म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यापासून या रोहिंग्यांना पुन्हा बांगलादेशात पाठवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.