भाजपचा आरोप : उपअधीक्षकांना निवेदन
सासवड – पुरंदर तालुक्यातील बरेच शेतकर्यांनी मोजणीसाठी आपल्याकडे रितसर अर्ज दिलेले आहे; परंतु आपल्याकडून मोजणीबाबत योग्य वेळेत कारवाई होत नसल्याबाबत अनेक शेतकरी बांधवांच्या तक्रारी वारंवार आमच्याकडे येत आहे. तसेच अगोदरही याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. आशा आशयाचे निवेदन भाजप किसान मोर्चा पुरंदर वतीने निवेदन उपअधीक्षक विकास गोफणे यांना देण्यात आले.
दैनंदिन कामकाजामध्ये वारंवार होणारी दिरंगाई यामध्ये त्वरित पारदर्शकता आणून सर्व कामे शासकीय नियमाने कालावधीमध्ये पूर्तता होण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी बारामती लोकसभा प्रमुख जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, तालुकाध्यक्ष भाजपचे निलेश जगताप, किसान मोर्चा अध्यक्ष संदीप देवकर, शहर अध्यक्ष संतोष जगताप, तालुका उपाध्यक्ष भानुकाका जगताप, युवा मोर्चा अध्यक्ष दिलीप कटके, अजिंक्य टेकवडे, सचिन पठारे, रोहिदास कड, मयूर फडतरे, आनंद जगताप, विशाल कुदळे, अर्थव भोंगळे सर्व पदाधिकार्यांचया उपस्थित होते.
भूमिअभिलेखच्या कार्यालयातील कामकाज 15 दिवसांमध्ये सुरळीतपणे सुरू न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू.
– जालिंदर कामठे, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र
या कार्यालयातील सर्व कामकाज हे येणार्या 15 दिवसांमध्ये सुरळीतपणे करू.
– विकास गोफणे, उपाधीक्षक, भूमिअभिलेख, पुरंदर