Election Result 2023 – उत्तर भारतात भाजपचाच वरचष्मा असल्याचे उघड झाले आहे. तीन राज्यातल्या पराभवाचे काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी ( priyanka Chaturvedi ) काँग्रेसला दिला आहे. तीन राज्यातले निकाल हे धक्का देणारे आहे. काँग्रेसकडून काही कमतरता झाली आहे.
मध्यप्रदेशात काँग्रेसची बाजी अचानक कशी पलटली याचा अभ्यास केला पाहिजे. तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. २०१८ साली काँग्रेसचा तीन राज्यांमध्ये विजय झाला होता. परंतु २०२३ मध्ये आता त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे.
मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही
महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडण्यात आले आहे. कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना गद्दारी करून घरी बसवण्यात आले आहे. हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा विकास विजय निश्चित आहे. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने कोणाचा चेहरा दिलेला नव्हता.
निवडणुकांची सर्व तयारी दिल्लीतून केल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील सगळा कारभार हा गुजरातला चालला आहे. जनतेला कोर्ट, निवडणूक आयोगाकडून अपेक्षा आहेत. गद्दारी झाली आहे, या निवडणुकीत रणनीती ही केंद्र सरकारने बनवली आणि ते यशस्वी झाले, असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.