बीड – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये अन्याय होत असल्याचे म्हंटले जात आहे. या कारणामुळे आता पंकजा मुंडे आता राजकारणात वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याशिवाय परळी तालुक्यातील पांगरी गाव येथे असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हंटले जात आहे
पंकजा मुंडे यांना एका मुलाखती दरम्यान आगामी 2024 निवडणुकी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले की, “माझ्यासारख्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट न देणे हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही, त्यांनी असा निर्णय घेतल्यास त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागेल. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न देणे हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही.
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपण नवीन मतदारसंघ शोधत नाही. खासदार प्रतिम मुंडे यांचीही जागाही मी घेणार नसल्याचे स्पष्ट मुंडे यांनी सांगितले. 2019 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा मंत्री धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. आता राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि भाजप एकत्र सत्तेत आहेत, हे दोन्ही गट एकत्र निवडणुका लढवणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून मिळालेल्या नोटीशीवर देखील भाष्य केले आहे. जीएसटी विभागाच्या ही घटना दोन-तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती, आताही घडली आहे आणि याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यावरील या कारवाईनंतर सु राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली होती. भाजपच्या निष्ठावंतांची भाजपमध्येच वंचना सुरु असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटं तुपात आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट (एक्स) द्वारे भाजपवर केली होती.