मुंबई – अभिनेता अक्षय कुमारने आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज केला आहे. मात्र या टिझरपेक्षा या चित्रपटाच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचे टायटलमध्ये बदल करण्यात आला आहे. सध्या देशात इंडिया विरोध भारत असा वाद सुरु आहे. अशातच अक्षयने इंडिया ऐवजी भारत शब्द बदलल्यामुळे सध्या त्याच्या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे,
दरम्यान, अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचे नाव मिशन रानीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू था असे ठेवण्यात आले होते. मात्र आता यातील इंडिया शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये टिझर कॅप्शन लिहिण्यात आले आहे की,’1989 मध्ये एका माणसाने अशक्य गोष्ट साध्य ..! 6 ऑक्टोबर रोजी मिशनराणीगंज चित्रपटगृहात भारताच्या खऱ्या नायकाची कथा पहा. चित्रपटाचा टीझर गुरुवारी, 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचेही अक्षयने कॅप्शनमधून चाहत्यांना सांगितले आहे.
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘मिशन रानीगंज: द ग्रेट भारत बचाव’ हा राणीगंज कोळसा क्षेत्रात 1989 मध्ये घडलेल्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार दिवंगत जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यांनी पुरात अडकलेल्या सर्व जिवंत खाण कामगारांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
टिन्नू सुरेश देसाई दिग्दर्शित, मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू चे दिग्दर्शन वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी केले आहे. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात परिणीती चोप्रा, पवन मल्होत्रा, कुमुद मिश्रा, रवी किशन, शिशिर शर्मा यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत.