अमरावती – समृद्धी द्रुतगती मार्गावर शनिवारी झालेला अपघात टायर फुटीमुळे किंवा बसच्या वेगामुळे झाला असण्याची शक्यता अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. आरटीओ ने जो अहवाल दिला आहे त्यात म्हटले आहे की, घटनास्थळी टायर फुटल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. किंवा टायरच्या खुणा नाहीत तेथे फुटलेल्या टायरचे तुकडेही आढळून आले नाहीत असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
वाचलेल्यांपैकी एकाने दिलेल्या तपशिलानुसार, बस रस्त्याच्या उजव्या बाजूला एका स्टीलच्या खांबाला धडकली, ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, जे नंतर दुभाजकाला धडकले, असे अहवालात म्हटले आहे. समोरच्या टायरचा दुभाजकावर आदळण्याचा परिणाम इतका गंभीर होता की त्यामुळे बसच्या चेसिसमधून समोरची एक्सल ऍसेम्ब्ली निखळली.
एक्सल असेंब्ली निखळल्यानंतर, बसचा पुढचा भाग रस्त्यावर आदळला आणि परिणामी घर्षणामुळे उष्णता आणि आग निर्माण झाली, बस चालू असताना इंजिन तेलाचे तापमानही जास्त असल्याने ही आग लागली असावी असे अहवालात म्हटले आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की,
या बसला समृद्धी एक्स्प्रेस वेच्या एंट्री पॉईंटपासून सिंदखेडराजा येथील घटनास्थळापर्यंत 152 किलोमीटरचा पल्ला कापण्यासाठी दोन तास 24 मिनिटे लागल्याने अपघाताचे कारण वेग असू शकत नाही. रात्री 11:08 वाजता बस एक्सप्रेसवेवर दाखल झाली आणि 152 किलोमीटर अंतरावर सकाळी 1:32 वाजता अपघात झाला, याचा अर्थ बसचा सरासरी वेग ताशी 70 किलोमीटर होता, असे अहवालात म्हटले आहे.