मुंबई – दबंग अभिनेता सलमान खान स्टारर चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ रिलीज झाला आहे. साऊथच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने या चित्रपटात सलमानने मोठ्या स्टारकास्टसह साऊथचा मसालाही या चित्रपटात देण्याचा प्रयन्त केला आहे. . मात्र, सलमानचा हा प्रयोग त्याच्यावरच उलटला आहे.
साऊथच्या प्रेक्षकांनी हा चित्रपट ‘स्टिरियोटाइप’ म्हणून नाकारला. याशिवाय सलमानची जादू न चालण्यामागे आणखी काय कारण असेल, हे साऊथ चित्रपटांचे ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी सांगितले आहे.
पहिल्या वीकेंडची कमाई पठाणच्या कलेक्शनच्या निम्मी आहे.
वृत्तमाध्यमांशी खास संवाद साधताना रमेश बाला सांगतले,’संपूर्ण दक्षिण पट्ट्यांसह चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे एकूण तीन कोटींचे कलेक्शन होते. वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीच कमाई केली, हा चित्रपट शनिवारी 4 कोटी आणि रविवारी 5 कोटींवर पोहोचला आहे.
ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, ‘व्यंकटेश बऱ्याच काळानंतर हिंदी चित्रपटांमध्ये दिसणे हे त्याचे मुख्य कारण होते. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी तेलुगू प्रेक्षकांची गर्दी झाली होती. यासह ईदच्या मुहूर्तावर मुस्लिम पट्ट्यांमध्ये चित्रपटाला पहिल्या दिवसापेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूणच या चित्रपटाने केवळ 12 कोटींचा व्यवसाय केला आहे. याआधी शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तर तीन दिवसांचे कलेक्शन 30 कोटींच्या आसपास होते, जे सलमानच्या चित्रपटाने निम्मेही गाठले नाही.’
दक्षिण भारतीयांना स्टिरियोटाइप म्हणून सादर केले गेले
दाक्षिणात्य प्रेक्षकांच्या प्रतिसादावर रमेश म्हणतात, चित्रपट पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांची निराशा झाली. सोशल मीडियावरही चर्चा झाली. खरंतर या चित्रपटातील काही दृश्यांवर चाहत्यांनी खूप आक्षेप घेतला होता. विशेषत: या चित्रपटातील ‘लुंगी’ गाण्यावरून गदारोळ झाला असून, या गाण्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. इथले लोक याला लुंगी म्हणत नाहीत तर धोतर किंवा मुंडू म्हणतात. म्हणजे तुम्ही कोणाची तरी संस्कृती दाखवत आहात, तर ती पूर्ण माहिती देऊन मांडायला हवी होती.
त्याच वेळी, काही प्रेक्षकांचा असा विश्वास होता की दक्षिण भारतीय व्यंगचित्र तयार केले गेले आहे. दाक्षिणात्य संस्कृतीचे सादरीकरण अतिशय स्टिरिओटीपिकल पद्धतीने करण्यात आले. अनेक चाहते राम चरण आणि व्यंकटेश यांना शिव्या देत होते की त्यांनी या गाण्यासाठी होकार का दिला.
रिमेकची जादू इथे चालत नाही
किसी का भाई किसी की जान हा साऊथच्या वीरम चित्रपटाचा रिमेक आहे. रमेश ला स्पष्ट करतात, सहसा दक्षिणेत प्रेक्षकांनी मूळ चित्रपट त्यांच्याच भाषेत पाहिलेले असतात, त्यामुळे रिमेकवर बनवलेले चित्रपट इथे चालत नाहीत. 2014 मध्ये अजित कुमारचा वीरम आला होता. त्यानंतर 2017 मध्ये पवन कल्याणने तेलुगूमध्ये कटमारायुडू केले. 2019 मध्ये, त्याचा रिमेक कन्नडमध्ये ओडेया म्हणून तयार करण्यात आला. तीच कथा मातृभाषेत पाहिल्यावर लोकांनी पुन्हा तीच कथा का पाहायला जावी. त्यामुळे आंध्रातील जनतेचा चित्रपटाला इतर राज्यांपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. तर तेलुगूमध्ये वेंकी आणि जगपट्टी बाबू यांच्यामुळे इथल्या प्रेक्षकांची संख्या चांगली होती.