मुंबई – हिवाळी अधिवेशनात भाजप आमदाराने दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटीची मागणी केली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही मागणी मेनी करत एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. यानंतर ठाकरे गटाकडून याविरोधात संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एसआयटी मार्फत चौकशी करायची असेल तर खोकेवाल्यांची देखील करा अशी मागणी केली आहे.
सरकार मागेल त्याला एसआयटी देत आहे. सरकारने एसआयटीचे रेशनिंग केले आहे. चाळीस आमदार ज्या पद्धतीने पन्नास खोके देऊन फोडण्यात आले तो नेमका काय व्यवहार होता याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सध्या सुरु असलेल्या विविध विषयांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
संपलेले विषय पुन्हा काढून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहे. आम्ही चौकशीला सामोरे जाऊ तुम्ही मात्र तोंडावर पडला असा इशारा देखील यावेळी राऊत यांनी दिला. सरकारपक्षातील अनेकांची प्रकाराने बाहेर पडलेली आहेत त्याचीही एसआयटी चौकशी करा या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज आहे,खाजवत बसा अशा शब्दात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
तुमची प्रतिक्रिया? व्यक्त व्हा कमेंट्स बॉक्समध्ये…#प्रभात_जनमत #sanjay_raut #DeepakKesarkar #Shivsena pic.twitter.com/AF28sH0z6e
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 24, 2022