नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाने आज मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारांच्या प्रचारापासून दूर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. ज्यांना कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी प्रथम त्यांच्या संघटनात्मक पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे त्यांच्या वैयक्तिक क्षमतेत कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत, पक्षाने म्हटले आहे की, प्रतिनिधी त्यांच्या आवडीनुसार, बॅलेट पेपरद्वारे त्यांच्यापैकी कोणत्याही एकाची निवड करण्यास स्वतंत्र आहेत”एआयसीसीचे सरचिटणीस/प्रभारी, सचिव, सहसचिव, प्रदेश कॉंग्रेस कमिटी (पीसीसी) अध्यक्ष, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे (सीएलपी) नेते, आघाडीच्या संघटनांचे प्रमुख, विभाग प्रमुख, सेल आणि सर्व अधिकृत प्रवक्ते कोणासाठी किंवा विरोधात प्रचार करू शकत नाहीत. 9,000 हून अधिक प्रदेश कॉंग्रेस कमिटी प्रतिनिधी मतदानात मतदान करतील.
कॉंग्रेसने सर्व पीसीसी अध्यक्षांना संबंधित राज्यांच्या दौऱ्यांमध्ये उमेदवारांशी सौजन्याने वागण्यास सांगण्यात आले आहे. उमेदवार जर एखाद्या ठिकाणी बैठक किंवा सभा घेऊ इच्छित असेल तर त्यासाठीची सारी व्यवस्था प्रदेश कॉंग्रेस समितीने केली पाहिजे असेही सुचवण्यात आले आहे. या सुचनेचा भंग जर उमेदारांकडून किंवा अन्य पदाधिकाऱ्यांकडून झाल्यास त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरवले जाईल असा इशाराही पक्षाने दिला आहे.