लंडन – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज यजमान इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर या मालिकेतही भारतीय संघाचेच वर्चस्व राहणार असून पहिल्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाचेच पारडे जड राहील.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक (टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली दुखापतीमुळे सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. भारतीय संघ पाच फलंदाज, दोन अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजांसह खेळत आहे.
India have opted to field in the first #ENGvIND ODI 👀
Who will get off to a winning start? pic.twitter.com/WDxxvGIHBu
— ICC (@ICC) July 12, 2022
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, प्रणंद कृष्णा.
इंग्लंड संघ : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडेन कार्स, रीस टोपली.
दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 103 सामने झाले आहेत. यापैकी 55 सामन्यात भारताने आणि 43 सामन्यात इंग्लंडने विजय मिळविला आहे.