नवी दिल्ली – काशीतील ज्ञानवापी मशिदीखाली शिवलिंग सापडल्याचा दावा आणि देशातील अनेक मशिदींखाली मंदिरं असल्याच्या दाव्यांदरम्यान बिहार सरकारचे मंत्री आणि भाजप नेते रामसुरत राय यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
रामसूरत राय यांनी म्हटले आहे की, ईदनिमित्त ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम बांधवांच्या घरी जातात, नंतर मुस्लिम बांधव त्यांना टोपी घालतात, त्याचप्रमाणे मुस्लिमांनी देवाला टोपी घालून सर्व मंदिरे बळकावली आहेत आणि त्यावर मशीद तयार केली आहे.
रामसुरत राय म्हणाले, “आज देव पृथ्वीच्या आतून कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होत आहे. कुठे राधा कृष्णाच्या रुपात तर कुठे शिव रुपात तर कुठे रामाच्या रुपात. जसे आम्ही ईदच्या दिवशी तुमच्या घरी येतो आणि त्यावेळी मुस्लिम बांधव आम्हाला टोप्या घालतात, त्याचप्रमाणे त्यांनी देवाला टोप्या घालून मंदिरे बळकावली आहेत.
रामसूरत राय पुढे म्हणाले की, ‘येणाऱ्या काळात मुस्लिमांना त्या जमिनीचा ताबा आपोआप सोडावा लागेल, कारण ती जमीन हिंदू संस्कृतीची आणि हिंदू बांधवांच्या पूर्वजांची आहे. आज आम्ही ते हिसकावून घेत नाही, तर येत्या काही दिवसांत त्यांनाच या जमिनीचा ताबा सोडावा लागेल, कारण ती जमीन आपल्या पूर्वजांचा आणि हिंदू संस्कृतीचा भाग आहे. त्यांच्या मुघलांनी ज्या प्रकारे राज्य केले आणि साम्राज्य स्थापन केले, मंदिर तोडून ते बळकावले. बदल हा जगाचा नियम आहे आणि प्रत्येकजण आज बदल म्हणून पाहत आहे.’
केंद्रातील भाजप सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंत्री रामसुरत राय यांनी जमुई येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, ज्ञानवापी या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली केली .