मुंबई – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकली नाही, असे कारण त्याच्याकडून नेतृत्व काढून घेताना दिले गेले. मात्र, खुद्द सौरव गांगुली यांनी तरी कर्णधार असताना भारताला अशी कोणती मोठी स्पर्धा जिंकून दिली. उलट कोहलीनेच हा दुष्काळ संपवताना अजून दोन वर्षे कर्णधारपग समर्थपणे सांभाळले असते व विश्वकरंडकही जिंकून दिला ऑअसता, अशा शब्दात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी कोहलीला उघडपणे पाटींबा देताना गांगुलीवरच ताशेरे ओढले आहेत.
केणताही खेळाडू कर्णधार होतो, तेव्हा त्याने प्रत्येक सामना किंवा स्पर्धा जिंकलीच पाहीजे अशी अपेक्षा करणे टुक आहे. प्रत्येकाच्या कारकीर्दीत एक बॅडपॅच येतो. कोणताही खेळाडू या स्थितीला अपवाद नाही. जर कोहलीने आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही असे सांगितले गेले मग गांगुली यांनी कोणती स्पर्धा जिंकून दिली.
कोहलीने सात वर्षे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखालीच संघाने परदेशात जिंकण्यात सातत्य राखले. कसोटीत क्रमांक एकचा संघ म्हणून भारतीय संघाची नवी ओळख निर्माण केली. केवळ आयसीसीच्या स्पर्धेला महत्व देत बाकी यशाकडे दुर्लक्षच केले जात आहे, असेही शास्त्री म्हणाले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाची कायम मक्तेदारी राहात नाही. असे कीती संघ आहेत त्यांनी विश्वकरंडक जिंकले आहेत. तसेच असे कीती कर्णधार आहेत की ज्यांच्या नेतृत्वात त्यांच्या संघाने विश्वकरंडक जिंकले आहेत. भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर खुद्द गांगुली, अनील कुंबळे, राहुल द्रविड व रोहित शर्मा यांनीही नेतृत्व केले मात्र, त्यांनी तरी कुठे देशाला विश्वकरंडक जिंकून दिला. मग केवळ कोहलीलाच का लक्ष्य केले गेले. एक विश्वकरंडक जिंकला म्हणजे सगळे मिळाले असे होत नाही. उलट कोहलीच्या नेतृत्वात सात वर्षांत भारतीय संघाने जे यश मिळवले तेच कोणत्याही मोठ्या विजेतेपदापेक्षाही महत्वाचे आहे, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.