नवी दिल्ली, – कॉंग्रेस पक्ष उद्या (शनिवार) देशभरात शेतकरी विजय दिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्त विजयी मिरवणुका काढल्या जाणार आहेत.
त्याशिवाय, आंदोलनकाळात विविध कारणांनी निधन झालेल्या शहीद शेतकरी आंदोलकांना श्रद्धांजली म्हणून कॅंडल मार्चचेही आयोजन केले जाणार आहे. शहीद शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांची भेट कॉंग्रेस नेते घेणार आहेत.
त्याबाबतची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी दिली. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांविरोधात शेतकऱ्यांनी सातत्यपूर्ण आणि धैर्याने लढा दिला. त्यामुळे सरकारला केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावे लागले. शेतकऱ्यांच्या लढ्याचा गौरव करण्यासाठी कॉंग्रेस शेतकरी विजय दिवस साजरा करणार आहे, असे त्यांनी नमूद केले.