रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी व कार मध्ये जोरदार टक्कर झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली आहे.