मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची जोरदार चर्चा दिसून येत आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.
आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. कायदेशीर लढा जो आहे, तो लढावा लागेल. पण आम्ही तुमच्यासारखे पक्ष सोडून आलो नाही. तुमच्यासारखे केंद्रीय मंत्री झालो नाहीत असा टोला नवाब मलिक यांना राणे यांना लगावला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
भाजपा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे व बेजबाबदारपणे कृत्य करत असल्याचा आरोपही मलिक यांना यावेळी केला आहे. राणेंना अटक झाल्यानंतर अनिल परब यांना ईडीची नोटीस येणे हे अपेक्षितच होते. त्यामुळे ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल. सूडबुद्धीने हे राजकारण सुरू आहे. याबाबत आता लोकांच्या मनात कसलीच शंका उरली नाही, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.