1987 साली रिलीज झालेल्या “मिस्टर इंडिया’चा रिमेक करण्याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. या रिमेकची जबाबदारी अली अब्बास यांच्यावर असणार आहे आणि यातील लीड रोल शाहरुख खान आणि रणवीर सिंह हे साकारणार आहेत, असे समजते होते..
रणवीर सिंहला अनिल कपूरच्या रोलसाठी विचारणा झाली आहे. तर दिग्गज अभिनेते अमरिश पुरी यांनी साकारलेल्या मोगॅम्बोच्या खलनायकाच्या अजरामर रोलसाठी शाहरुख खानला विचारणा झाली होती,असेही समजते आहे.
मात्र, शाहरुख खानला नकारात्मक भमिका साकारायची नसल्याने त्याने हा रोल नाकारला असल्याचे समजते आहे. अली अब्बास यांचा हा रिमेक म्हणजे पूर्वीच्या “मिस्टर इंडिया’चा दुसरा भाग किंवा अगदी जसाचा तसा रिमेकदेखील असणार नाही.
जुन्या कथेवरील नवीन ढंगातील हे सादरीकरण असणार आहे. त्यासाठी स्क्रिप्टमध्ये खूप फेरबदल केले जाणार आहेत. हे काम सध्या सुरू आहे.
शाहरुख खानला सर्वात शेवटी आनंद एल. राय यांच्या “झिरो’मध्ये बघितले गेले होते. हा सिनेमा आपटल्यापासून शाहरुखने नवीन कोणताही सिनेमा स्वीकारलेलाच नाही.